सोमवार, १९ एप्रिल, २०२१

मातंग वधुवर सुचक व सहकार्य ग्रुपच्या माध्यमातून केलेल्या प्रयत्नाचा लेखाजोखा

*थोडासा संवाद*
 मातंग वधुवर सुचक व सहकार्य ग्रुपच्या माध्यमातून मागील वर्षी व्हाटस अप ग्रुप सुरू करण्यात आले. अक्षरक्ष: बायोडाटांचा व मेसेजचा ओघ सुरू झाला. मात्र लग्नसराई चा मौसम सुरू होऊनही पाहिजेत तसेच बायोडाटा आता येत नाहीत. येतात ते रिपीट झालेलेच. इतरांच्या ग्रुपवरही तिच परिस्थिती आहे. पुर्वी 1988 पुर्वीचे अनेक बायोडाटा यायचे आता ते फारच कमी झालेत. खरं तर ही आनंदाची गोष्ट आहे. कि कोणत्या का माध्यमातून अनेकांची लग्न जुळून आले आहेत. अनेकांची लग्न जुळून आल्यामुळे बायोडाटांचा ओघ कमी झाला आहे. त्यातच ग्रुपमध्ये इतर वधुवर ग्रुपची लींक टाकुनी अनेकांनी ग्रुप सुरू केले आहेत. आम्ही एक एक पालकांचा मोबाईल नंबर मिळवून त्यांचा मोबाईल नंबर सेव्ह करून ग्रुप सुरू केला. मात्र इतरांनी आयत्या पिठावर रेघोट्या मारल्या . प्रत्येक जिल्ह्यातील व्यक्ती जोडुन त्या जिल्ह्यात ग्रुप सुरू केला. नंतर त्याचेच अनुकरण इतरांनी सुध्दा केले व्यवसायीक संस्थांनी केले. शिखंडीना हाताशी धरून लींक ग्रुपमध्ये टाकल्या ग्रुप सुरू केले. आनंदाची गोष्ट हिच आहे की समाज बांधवापर्यंत बायोडाटे सहज पोहोचू लागले. *मातंग वधुवर सुचक व सहकार्य ग्रुपने कधी स्वतःची जाहिरात केली नाही. इतरांच्या बायोडाटाखाली स्वत:चे नंबर टाकले नाही. ग्रुपचे नाव लिहीले नाही. कोणतीही अपेक्षा न ठेवता समाजासाठी चिमणीच्या चोचीने का होईना काम करायचे हाच उद्देश होता. वधुवरांच्या धन्यवादाची सुध्दा अपेक्षा केली नाही. आणखी सर्वात महत्त्वाचा उद्देश होता. *महाराष्ट्रातील मातंग समाज ग्रुपच्या माध्यमातून एकत्रीत यायला हवा*. ग्रुपचा काम करण्याचा मुळ सिध्दांत जो होता. *कोणतीही अपेक्षा न ठेवता फक्त समाजाला काही देता यावे या भावनेतून काम करणारे कार्यकर्ते पुढे यावेत*. ना प्रसिध्दिची भावना, ना नेता होण्याची महत्त्वाकांक्षा या प्रकारचे सामाजिक कार्यकर्ते तयार व्हावेत. ज्यांनी समाजाला फक्त देण्याचे आणि देण्याचेच काम करावे. समाजात करोडो संघटना आहेत पण समाजाला उपयोगी होईल असे काम जर सर्वांनीच केले.तर समाजात अनेक समाज उपयोगी उपक्रम सुरू होतील. करोडो कार्यकर्ते समाजासाठी झटतील. 
           पण खुप साऱ्या समाज संघटना फक्त दबावगट होऊनच काम करतात. संघटना मोठी होऊन आपन त्याचे नेते राहू आपन प्रसिद्ध होऊ हा उद्देश असतो. *समाजाला काय द्यायचे , काय देता येऊ शकते याचे नियोजन कोणाकडे नसते.* त्यामुळे संघटने कडुन समाजाला काही देता येत नाही. संघटनांच्या नावावरच हजारो संगठन तयार होऊन समाज लाखो ठिकाणी विखुरलेल्या गेला आहे. त्यामुळे संघटनांचा फायदा खुप कमी होतो. कुठे अन्याय झाला तर अनेक संघटना निवेदन देतात.त्यामुळे कार्यवाही वैगेरे होते पण समाजावरचा अन्याय काही कमी होत नाही. कारन अन्याय कमी करण्यासाठी समाज ताकदवान, सामर्थ्यवान होने आवश्यक आहे. समाज जर सामर्थ्यवान करायचा असेल. तर एक वैचारिक, आर्थिक, राजकीय, प्रशासकीय, सांस्कृतिक सामर्थ्य तयार करावे लागेल. व ते एका दिवसात तयार होणार नाही. त्यासाठी वर्षानुवर्षे नियोजन करून कष्ट घ्यावे लागतील. त्यासाठी समाजातील प्रत्येक समाज बांधवांनी " कोणतीही अपेक्षा न ठेवता समाजासाठी काम करावे लागेल" परंतू  स्वार्थासाठी, प्रसिध्दीच्या हव्यासासाठी काम करणारे भरपूर आहेत. समाजासाठी काम करणारे कमी. सहकार्य ग्रुपच्या माध्यमातून निरपेक्ष भावनेने काम करणारे कार्यकर्ते हेरून सामाजिक काम आणखी मोठे करता येईल ही भावना होती. पण काहिंनी ही भावना न ओळखता ज्यांच्यावर विश्वास होता त्यांनीच गद्दारी केली. व वेगळा ग्रुप सुरू केला. कालपर्यंत गल्लीतलं कुत्र ज्यांना ओळखत नव्हते त्यांना सहकार्य ग्रुपचे पद मिळाल्यामुळे महाराष्ट्र भरातुन मोठमोठ्या पदावरील, प्रतिष्ठीत पालकांचे फोन यायला लागले. आणि त्यांच्या डोक्यात ही प्रसिध्दीची हवा भरली. ग्रुप फोडुन वेगळा ग्रुप सुरू केला.  पण वधुवर ग्रुप हे एक उदाहरण होतं, नमुना होता कि समाजासाठी आपन काम करू शकतो. आपन निरपेक्ष भावनेने काम करणारे व्यक्ती समाजात चांगले काम करू शकतो. सामाजिक काम करण्याच्या अनेक वाटा आहेत. आनंददायी वाटा आहेत. पैसा, प्रसिध्दी मिळाली नाही तरी प्रेम , जिव्हाळा, आनंद मिळवून देणाऱ्या आहेत. सहकार्य ग्रुपच्या माध्यमातून लवकरच अनेक उपक्रम हाती घेण्यात येतील. आपल्या सर्वांच्या सहकार्याची गरज आहे. यासाठी सहकार्य ग्रुपमध्ये आपले स्वागत आहे. सहभागी व्हा🙏🙏🙏🙏
                             9823453275