मंगळवार, १८ फेब्रुवारी, २०२०

मातंग समाजाने किती दिवसं माता, भगीनी, मुलीवर होणारे बलात्कार बघायचे?

संगिता कांबळे प्रकरणाची शाई वाळते न वाळते तोच पुन्हा सिल्लोड तालुक्यातील डोंगरगावामध्ये ३२ वर्षीय महिला व ७ वर्षीय चिमुकलीवर बलात्कार करून ठार मारल्याची बातमी व्हाटस आप ग्रुपवर आली. संपुर्ण मानवजातीला काळीमा फासणारी गोष्ट आहे. ज्याच्या कुणाच्या घरात आई बहीण मुलगी असेल त्या प्रत्येकाला हळहळ वाटल्याशिवाय राहणार नाही. रक्त उसळल्याशिवाय राहणार नाही. फक्त जातियवादाने ओतप्रोत भरलेल्या नीच विचारधारेच्या लोकांनाच वाईट वाटणार नाही. दोन दिवसापुर्वी म्हणजे शनीवारला २२ फेब्रुवारीला आई मुलगी शेतामध्ये गवत आणण्यासाठी गेल्या होत्या. त्या परत आल्याच नाहीत. म्हणुन हरविल्याची तक्रार पोलीस स्टेशनला रितसर नोंदवीली होती.पोलीसांनी कोणताच प्रतिसाद दिला नाही. आज त्या आई मुलीचं प्रेत विहीरीमध्ये आढळून आले. अतिशय क्रृरपणे बलात्कार करुन त्यांना ठार मारण्यात आले प्रथमदर्शनी तर असंच दिसतं आहे. दोघींचे जीभ बाहेर आलेली, डोळे बाहेर आलेले, गुप्तांगात काड्या टाकलेल्या. विकृत मानसिकता असलेल्या लोकांचेच हे काम असावं. इतर दुसर्ऱ्या समाजातील मुलगी असती तर संपूर्ण महाराष्ट्रात हल्लकोळ निर्माण झाला असता. पण मातंग समाज सुध्दा माणुस आहे. या देशाचा घटक आहे. हिंदू धर्माचाच हिस्सा आहे. म्हणुन ना कोणता भारतीय धावून येतो. ना कुणी हिंदू .विहीरीतील प्रेत सुध्दा कुटूंबीयांनीच बाहेर काढले आणि घरातील मंडळीनीच बाजेवर टाकुन विहीरीपासून घरापर्यंत आणले. ना देशातील अम्बुलेन्स धावून आली. ना देशातील पोलीस यांनी विहीरी बाहेर प्रेत काढले. ना एखादी हिंदू धर्मातल्या धर्मादाय संस्थेची गाडी आली.
        वय वर्ष सात व त्या मुलीवर बलात्कार  म्हणजे पशू सुध्दा असं काही करत नाही. खरच आपण माणसांच्या सभ्य समाजात राहतो. की कपडे घातलेल्या नराधमांच्या. खालील फोटो हा त्या मुलाचा आहे. जो आपल्या आई बहीणीच्या पोस्टमार्टम नंतर प्रेताची वाट पाहतोय.

उद्या  असं आई बहीणीवर बलात्कार होऊन बघत राहण्यापेक्षा समाजातील लोकांनी आजच अन्याया विरूध्द लढत लढत मरायला हवे. लाखोंचे हजारांचे  मोर्चेचे काढुन बलात्कार थांबले  नाहीत. मोर्चाची भीती बलात्कार करणारांना वाटत नसते . मोर्चा शासनाला समाजातील असंतोष दाखवण्यासाठी होत असतो. शासनाला भितीवाटते  की मोर्चा तील लोक यांच्याकडे दुर्लक्ष केले तर ते नाराज होऊन आपल्या विरोधात मतदान करतील. पण आजकाल समाज कितीही नाराज असला तरी निवडणुकीत ती नाराज एकगठ्ठठा मते कुठेच दिसत नाही. त्यामुळे समाजाच्या मोर्चाना शासन किंमत देत नाही. यावेळी मायावतीजींचे वाक्य आठवते "वोटो को बेचना मॉ बहनो की इज्जत बेचने के समान है" जर मतं विकले जात असतील तर समाजाच्या मोर्चाला  कोणी किंमत देणार नाही.
                               मोर्चाला जमा होणाऱ्या लोकांनी गाडीभाड्याचे पैसे वर्गणी म्हणुन दिले आणि त्या पैशातून तरूण मुलामुलींसाठी व्यायामशाळा काढली निडर , बलवान मुले-मुली गावात तयार झाले तर नक्किच अन्याय अत्याचार कमी होतील. हजारो मोर्चा पेक्षा आजुबाजुच्या दहा गावातून दहा झुंजार लोक तयार होऊन जर एक होऊन अन्याय करणाराचा वचपा काढतील. तर नक्कीच अन्याय अत्याचार कमी होतील. "शंभर वर्षे शेळी होऊन जगण्यापेक्षा एक दिवस सिंह होऊन जगा" बाबासाहेबांनी सांगितलेले आहेच. समाजातील लोक मरणाची भिती सोडून लढत नाहीत तोपर्यंत अन्याय अत्याचार कमी होत नाही. पोलीसांकडून , शासनाकडून संरक्षणाची न्यायाची अपेक्षा करने खुप झाले. आता आपल्या मधूनच फकीरा, उमाजी नाईक उठून उभे राहिले पाहिजेत. तसे संस्कार येणाऱ्या पिढ्यांना दिले पाहिजेत. 
         समाजातील काही लोकांनी लढत लढत मेल्याशिवाय भावी पिढीला ईज्जत सुरक्षित ठेवून जगता येणार नाही. आई बहीणीं , मुलींच्या इज्जती वर हात टाकू पाहणारे हात ओळखुन वेळीच छाटले पाहीजेत. त्या दृष्टीने समाज प्रशिक्षीत झाला पाहीजेत. अण्णाभाऊंच्या कथा कादंबऱ्या तील पात्र अन्याय सहन करत नाहीत. अण्णाभाऊ साठे यांना सुध्दा भेकड नाही तर लढवय्या समाज अपेक्षीत होता. 
मातंग समाजातील मुलीबाळीवर झालेल्या अन्यायाचा बदला घेतला गेला तरच अन्याय अत्याचार थांबतील.

तरुणांनी फक्त व्हाटस अप, टिकटाॅक, फेसबुकवर शूर होण्यापेक्षा रक्तातील पुर्वजांचा शुरपणा प्रत्यक्ष जीवनात आणायला हवा. "नडला त्याला तोडला " फक्त व्हाटस अप, फेसबुकवर पोस्ट टाकणारांनी खरोखरच जर प्रत्यक्ष जीवनात एखाद्या बलात्कारी तोडला तर समाजाची मान गर्वाने ताठ होईल. पोचिराम कांबळे यांच्या मुलांनी बापाच्या हत्येचा बदला घेतला.  त्या चंदर कांबळे चे नाव दलीत समाजाच्या इतिहासात अमर होईल. त्यांचा इतिहास समाजासमोर आला पाहीजेत. सांगण्याचे मतीतार्थ अन्याय करणारांना जोपर्यंत त्यांच्याच भाषेत उत्तर दिल्या जात नाही तोपर्यंत अन्याय थांबणार नाहीत. सर्व मिळून चर्चा करून एक रणनीती ठरवायला हवी. सर्वच सोशल मेडीयात नाही लिहीता येणार. प्रत्यक्ष भेटीत नक्किच बोलू. 

रविवार, १६ फेब्रुवारी, २०२०

मातंग समाजातील सिल्लोड जळिता मृत संगिताताई कांबळे साठी महाराष्ट्र का पेटला नाही?

2 फेब्रुवारी 2020 रोजी व 3 फेब्रुवारी 2020 रोजी महाराष्ट्रात दोन समान घटना घडल्या सिल्लोड येथे 2 फेब्रुवारी रविवारला सिल्लोड तालुक्यातील अंधेरी या गावी संगीता कांबळे या मातंग समाजाच्या महिलेवर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला व तिने नकार दिल्यामुळे तिला पेट्रोल टाकुन पेटवण्यात आले.   त्यामध्ये ती 95% जळाली व नंतर तिचा मृत्यू झाला. 03 फेब्रुवारीला अंकिता पिस्सुडे या मुलीला हिंगणघाट येथे पेट्रोल टाकुन  जाळण्यात आले. त्यामध्ये ती 40 टक्के जळाली व नंतर तिचा मृत्यू झाला. या दोन्हीही घटना भिषण आणि लाजिरवाण्या आहेतच . दोन्ही आरोपींना कठोर शासन व्हायलाच पाहिजेत. पण या दोन्ही घटनेमुळे जातीयवादाचा लपलेला महाराष्ट्रातील चेहरा समोर आला. भाडखाऊ मेडीयाची छिनालवृत्ती दिसून आली. जात पाहून हळहळणारे समाजमन, जात पाहून संतप्त होणारे मानवतावादी पुढे आले. संगिता कांबळे हे नाव मेडीयात कुठेच नव्हते तर अंकिता ज्याची त्याची ताई झाली होती. कुठेतरी फक्त मातंग समाजाचे चार दोन कार्यकर्ते , त्यांच्या संगठना  संगिताताई साठी झटत होत्या तर अंकिता साठी सर्व स्तरावर सोशल मेड़िया, न्युज पेपर मधुन आग ओकल्या जात होती. अगदी फेसबुकवर राष्ट्रिय स्तरावरून प्रतिक्रिया येत होत्या. औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील साहेब यांनी संसदेमध्ये संगिताताई साठी आवाज उठवल्यानंतर तर संपुर्ण देशाला माहीत पडले की संगीताताई कांबळे यांना सुध्दा जाळून टाकण्यात आले आहे तरी सुध्दा अंकीतासाठी लिहीण्यात येणारे लेख, पोस्ट यांची दिशा संगीताताई कडे वळली नाही. नितीन राऊत या मंत्री महोदयांनी अंकीता ताईचा संपुर्ण मेडिकल खर्च सरकार उचलणार जाहीर केले. पण संगिताताई बद्दल त्यांना शब्दही माहीत नसावा त्यामुळे ते बोलले नसावे. अंकिता ताई यांच्यावर काय उपचार सुरू आहेत. कुठुन कुठे हलवले यावर मेडीयातून भरपुर छापुन येत होते मात्र संगिताताईचा मृत्यू झाल्यानंतरच व्हाट्स अपवर मातंग समाजाच्या ग्रुपवर पोस्ट आली आणि माहीत पडले कि संगिताताई कांबळे मातंग समाजाची महीलेला जाळून टाकून मारण्यात आले. 
                           अंकीताच्या मृत्यू अगोदर तीन दिवस अगोदर संगिताताईचा मृत्यू झाला होता तेव्हा महाराष्ट्राचे समाजमन हेलावले नाही. मात्र संगिताताईच्या मृत्यूवेळी घेनदेन नसणारा मेडीया मात्र अंकिताताईच्या मृत्यूवेळी मात्र प्रचंड भावनीक झाला. सर्व स्तरावरून अंकिताच्या मारेकरी याला फाशी द्या त्याला एन्काउंटर करुन मारून टाका. घश्याला कोरड पडेपर्यंत मागणी होत होती पण संगिताताईचा मारेकरी यांचे नाव ही कुणाला माहीत नव्हते. सारखेच कृत्य करणारे मारेकरी असतांनी एकासाठी एक न्याय व दुसर्याच्या
 साठी एक न्याय का? संगीताताईच्या मारेकऱ्यांने तर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला होता. सारं काही ठरवून पध्दतशीरपणे प्लॅन आखुन केले होते. तर अंकिताच्या मारेकऱ्यांने वेळेवर गाडितील पेट्रोल काढुन अंगावर ओतले होते. मग अंकीताचा मारेकरी विवेक नगराळे बौध्द आहे म्हणुन त्याचे एन्काऊंटर करा व संतोष मोहीते मराठा आहे म्हणुन त्यांचा निषेध सुध्दा करायचा नाही. ही जातियवादी मेडीयाची व समाजातील पांढरपेश्या निषेध करणारांची मानसिकता प्रचंड विकृत आहे. या मानसिकतेचे लोक कुलदीप सेंगर प्रकरणात उन्नाव घटनेतील पिडीता जेव्हा जाळुन टाकली तेव्हा का षंढ होऊन पाहत होते? मेडीया तेव्हा का षंढ झाली होती?  मग फक्त  अंकिता प्रकरणाला युगानुयुगा नंतर घडलेली घटना मेडीयाला का वाटते आहे? 
            अंकीता प्रकरणांमध्ये ओरडणारे जर प्रामाणिक असते तर त्यांना संगीताताईच्या प्रकरणाचे सुध्दा वाईट वाटले असते. जर अंकितामध्ये त्यांना ताई दिसली असती संगितामध्ये सुध्दा त्यांना ताईच दिसली असती. पण शंका आहे कि अंकिता प्रकरणांमध्ये रस्त्यावर उतरलेली मंडळी आणि मेडीया आसिफा प्रकरणांमध्ये आरोपीच्या समर्थनार्थ उतरलेली मंडळीतील काही मंडळी एकच आहेत. या प्रकरणात आपली पोळी भाजून घेत आहेत. आरोपीची आणि पिडीताची जात बघुन घटना व्हायरल केल्या जात आहे. ज्यामुळे दोन्ही समाजात संघर्ष निर्माण व्हावा. मात्र संगिताताईचे प्रकरण व्हाईरल यासाठी होत नाही की यांचा फायदा जातीयवादी संघटनांना होत नाही. दोन्ही प्रकरण जर व्हाइरल झाले तर लोकांच्या लक्ष्यात येईल कि गुन्हेगारांना जात नसते. पण अंकिता प्रकरणात तर फक्त गुन्हेगारांची जात दाखवायचा प्रयत्न केल्या जात आहे. तर संगिता ताईच्या घटनेत गुन्हेगाराची जात व प्रत्यक्ष गुन्हेगारालाच लपवलेल्या जात आहे.
      देशामध्ये देशद्रोही, भ्रष्टाचार, आतंकवादी घटना, बलात्कार या गुन्ह्यांमध्ये दलीतांचे प्रमाण अत्यल्प आहे. मोठमोठ्या करोडोच्या भ्रष्टाचारात व देशद्रोही घटनांमध्ये तर ते शुन्य आहे. एकुन बहुजन समाजाचे प्रमाणच शुन्य आहे. मात्र ज्या क्षुल्लक घटनांमध्ये जर आरोपी दलित असेल तर त्या घटनेला खुप मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी देऊन दलीत समाज त्यांची समानतावादी विचारधारा, त्यांचे महापुरुष यांना टारगेट  केल्या जात आहे. अंकीता प्रकरणांमध्ये सुध्दा फेसबुकवर छुप्या पध्दतीने हे केल्या जात आहे. या प्रकारे प्रेमप्रकरणातून हत्या केल्या गेल्याचे हे प्रकरण एकमेव नाही. या प्रकारचे कित्येक प्रकरनं यापुर्वीसुध्दा झाले आहेत. निर्भया किंवा हैदराबाद प्रकरणा इतकी  गंभीरता या प्रकरणाला का दिली जात आहे. मातंग समाजाच्या मातंग समाजाच्या नांदेड येथील चिमुकल्या विद्यार्थिनी पासुन तर संगीता कांबळे सारख्या महिलेसोबत अत्याचार होतात. मातंग समाज रस्त्यावर उतरतो तेव्हा मेडीयात हे प्रकरने का गाजत नाहीत.तेव्हा आज रोजी ट्रोल करणारी गॅंग कुठे असते? का न्याय मिळेपर्यंत प्रकरण मेडीयात राहत नाही.   
             विवेक नगराळे विरूध्द उज्वल निकम यांना लावण्यात येते. संगिता कांबळे कींवा इतर मातंग बघिनी यांच्या मारेकऱ्यांना अटक करा म्हणुन मोर्चा काढावा लागतो. मातंग समाजातील माझ्या बांधवांना मला हेच सांगायचे आहे. मेडीया हे मनुवाद्यांचे एक हत्यार आहे आणि ते पध्दतशीरपणे बहुजन समाजाविरोधात वापरले जाते हे साहेब कांशीरामजी सांगायचे. आपल्या विरोधातील अन्यायाविरुद्ध आपल्यालाच लढावे लागेल. मनुवादी मेडिया मदत करणार नाही. मनुवादी व्यवस्था उलथून टाकल्याशिवाय अन्याय अत्याचार ही थांबणार नाहीत. मनुवादी व्यवस्था उलथविण्यासाठी संपुर्ण दलीत, ओबीसी, आदिवासी यांना एकत्रीत यावे लागेल.
 फक्त मोर्चाने समश्या सुटत नसतात. तर समश्या केव्हा सुटते हे फुले, शाहू , आंबेडकर, अण्णाभाऊ, कांशीराम यांनी सांगितले आहे. संगिताताईला न्याय मिळेल की नाही माहीत नाही. मातंग समाजामध्ये आणखी दुसरी संगिता कांबळे होऊ नये यासाठी मुळापासून तयारी करावी लागेल. त्यासाठी मातंग समाजाने मेडियातील बातम्या वाचून आपली वैचारिक भुमिका न ठरवता मानवतावादी विचारधारेचा असल्यास करून तसे संस्कार येणाऱ्या पिढ्यांना दिले पाहिजेत. आपल्या प्रत्येक समश्येच्या मुळाशी जातीयवाद आहे हे लक्ष्यात घेतले पाहीजेत. प्रत्येक समश्येवर उपाय आहे. मात्र तो उपाय सोशल मेडीयावर न बोलता, न सांगता प्रत्यक्ष चर्चा करून समाजातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचून केडरकॅंपद्वारे  उपाय योजना  सांगता येईल. त्यासाठी लवकरच सर्वांनी केडरकॅंपच्या माध्यमातून भेटण्याचा प्रयत्न करत आहे.
               


सोमवार, १० फेब्रुवारी, २०२०

मांग किंवा मातंग समाजाच्या जागतीक इतिहासातील काही गौरवास्पद संदर्भ

मातंग किंवा मांग म्हणुन ओळखल्या जाणारा मातंग समाजाचा गौरवशाली इतिहास जागतीक ऐतिहासिक घडामोडींना स्पर्श करणारा आहे. ऐकेकाळी भारताच्याच नव्हे तर जगाच्या प्राचीन इतिहासावर प्रभाव असलेला मातंग समाज होता. यांचे अनेक संदर्भ वेळोवेळी सापडतात. मात्र त्याच्याकडे इतिहास या दृष्टिकोणातून बघितल्या जात नाही. मातंग समाजातील घराघरात पुर्वजांकडून चालत आलेली माहीती व संस्कार आहेत यामध्ये सर्वांकडुन हे बिंबवीले जाते आपण खुप महान आहोत. आपला वंश खुप महान आहे. वास्तविक परिस्थीती मध्ये मात्र हे कुठेच दिसत नाही. मातंगा व्यतिरीक्त कुठलाही अन्य समाज मात्र याला दुजोरा तर देणार नाहीच उलट त्यांना ह्या सर्व बाबी हाश्यास्पद वाटतील. मातंग सर्वाधिक तुच्छ समजण्याचे अनुभवच सर्वांकडे आहेत. स्वत: मातंगाला हे सांगता  येणार नाही आमचा इतिहास कसा महान आहे. यांचे पुरावे त्याला देता येणार नाहीत. मातंग समाज ज्या दृष्टिकोणातून स्वत:कड़े बघतो तोच दृष्टिकोन मातंग समाजाच्या शत्रूनी निर्माण केलेला आहे. आपली महानता भारतीय समाजावर बिंबवण्यासाठी ज्या ग्रंथाची, मुल्यांची  निर्मीती ब्राम्हणांनी केली मातंग समाज सुध्दा आपला इतिहास त्याच ग्रंथामध्ये, मुल्यांमध्ये  शोधण्याचा प्रयत्न करतो. मात्र मातंग समाजाने जैन, बौध्द, ख्रिश्चन, पारसी यांच्याशी निगडीत साहीत्य तपासले तर मातंग समाजाचा जाज्वल्य इतिहास बाहेर पडतो. 
                मातंग समाजाचा भव्यदिव्य इतिहास जगातील कोणीच नाकारू शकत नाही त्याचा पुरावा स्पष्टपणे बायबलमध्ये सापडला आहे. 'मातंग' हां शब्द अलीकडे मांग संदर्भात मोठ्या प्रमाणात वापरला जातो  मात्र फुलेंच्या काळापर्यंत किंवा अण्णाभाऊंच्या काळापर्यंत मातंग शब्दापेक्षा 'मांग' म्हणुनच सर्वत्र उल्लेख आहे. अण्णाभाऊंच्या साहीत्यात ' मांग' हां शब्दच मोठ्या प्रमाणात आहे. मातंग हा शब्द अण्णाभाऊंच्या प्रचंड मोठ्या  साहीत्यात सापडने दुर्मिळच . नंतरच्या अगदी अलिकडे मोठ्या प्रमाणात 'मातंग' या शब्दाचा वापर मोठ्या प्रमाणात सुरू झाला. मात्र मांग किंवा मातंग हे शब्द समानार्थीच आहेत. महाभारतात मतंग हां शब्द अस्पुश्याशी संबंधीतच येतो. जातक कथांमध्ये मातंग हा शब्द बुध्दाचा पुर्वजन्मातील एक जन्म ज्या जन्मातील  नाव मातंग आहे तो सुध्दा शुद्र किंवा हलक्या जातीचा म्हणुनच येतो. चांडाळ, मातंग, मांग, मेघ,मेग, माग, मंग, मग्ग अश्या अनेक उच्चार असलेला संबोध मातंग समाजाशीच संबंधीत आहे. दहा हजार वर्षाच्या इतिहासात अनेक सुक्ष्मसे बदल आपल्याला विवीध काळामध्ये बघायला मिळतात.  
   आनंदाची गोष्ट म्हणजे बायबलमध्ये मातंग समाजाशी संबंधीत जो उच्चार सापडतो तो मागी कींवा मागस् , मेग म्हणुन आढळतो. Gosspels of Magi म्हणुन शतकोंशतके पाश्चात्य जगामध्ये चर्चा होते असते. ख्रिस्ताचा जन्म झाला तेव्हा पुर्वेकडील देशामधुन तीन मागी आले. हे मागी कोण?  कुठल्या देशाचे? त्यांचे नाव? त्यांची संख्या ? यांचे अप्रुप सर्व पाश्चिमात्य जगाला वाटते. त्यावर सतत चर्चा होते असते. तुम्ही जर गुगल वर मागी , Three King of East, Three wise man असे सर्च केले तर त्या विषयी माहीतीचा खजिनाच बाहेर पडेल. अनेक पुस्तकें, चित्र, व्हीडीओज तुम्हाला सापडतील. अनेक लेखकांनी अनेक पुस्तकें लिहून आपले मत मांडले आहे. Magi हा अनेकवचन असलेला शब्द आहे. तर त्याचे एक वचन Magus मागस् किंवा मेगस कसा उच्चार होतो. दोन्ही उच्चार मातंग समाजाकडेच बोट दाखवतात. पुर्वेकडील देशामधून मांगी आलेत .ईस्त्राईलच्या   पुर्वेकडे राहणारा "मागी  किंवा माग हा एकमेव मातंग समाज आहे. कालही होता आजही आहे. ते पुर्वेकडून म्हणजे पार्शिया , अफगणिस्तान , भारत या देशामधून आले असावेत असे मत प्रवाह आहेत सर्व मते मान्य केले तरीही प्राचीन काळी भारताची सिमा या सर्व भुप्रदेशांना सामावून घेणारी होती. यांना  जर इतर देशाचे मानले तरी हे सिध्द होते की मातंग समाज भारतातच नव्हे तर इतर देशामध्ये सुध्दा होता हेच सिध्द होते. 
         मांगी ख्रिस्ताचे भविष्य सांगण्यासाठी बेथलेहेम  येथे जातात. मांगी म्हणजे कोण? मागी म्हणजे पुर्वैकडील देशाचे राजे म्हणुन त्यांचा उल्लेख होतो. मांगी म्हणजे फक्त व्यक्तीच जर असत्या तर  मोठे अप्रुप नसते. पण मागी म्हणजे पुर्वेकडील देशाचे राजे म्हणुन त्यांचा उल्लेख आहे. Their identification as kings in later Christian writings is probably linked to Isaiah 60:1–6, which refers to "kings [coming] to the brightness of your dawn" bearing "gold and frankincense".[5] 
या  मांगी ना " ख्रिस्ती जगामध्ये "तीन विद्वान" Three wise men आणि Three King of East  म्हणुन ओळखले जाते. ख्रिस्त काळामध्ये पुर्वेकडे मातंग समाज शासक होता  त्याचा पुरावा आहे. मांगी या शब्दाचा अर्थ King of East होतो.  मुळ बायबल मध्ये Magi  ऐवजी Magos  हां शब्द आहे .
मग वर उल्लेखीत मागी हे मातंगच होते याला पुरक ठरतील असे अनेक पुरावे संदर्भ सापडतात. येशू ख्रिस्ताचा जन्म 25 डिसेंबरला झाला आणि मागी हे 6 जानेवारीला त्यांना भेटले. म्हणजे ज्या रात्री मुलाचे बारसे करण्याची प्रथा भारतात आहे. त्याच रात्री येशू ख्रिस्तांना मागी भेटून भेटवस्तू देतात. बारश्याला नाव ठेवने, पाळना म्हणने, या प्रकारचा समारोह भारतात करतात.निदान  महाराष्ट्रात मातंग समाजासह सर्व बहुजन समाज करतो. त्याच बारादीला येशू ख्रिस्ताला मागी भेटतात. एका अर्थाने बारादी साजरी करतात. ख्रिस्ती जगामध्ये त्या प्रित्यर्थ आजही खुप ठिकाणी वेगवेगळ्या पध्दतीने तो दिवस साजरा केल्या जातो. त्या सणाला Ephiphany (Holiday) म्हणतात. काही ठिकाणी "ख्रिस्ताचा बाप्तीस्मा"(Baptisma of zesus) म्हटले जाते. काही वेळा Three kings day म्हटले जाते. काही ठिकाणी "तीन राजांचा केक " कापला जातो. मागीचे महत्त्व आपल्याला कळून येईलच आणि त्याचा भारतीय संस्कृतीशी असलेला संबंधही कळून येईल.
        तिन मागी  हे भविष्यशास्त्रात पारंगत होते. मातंग समाज सुध्दा भविष्यशास्त्रात पारंगत होता. भाडळी ही मातंग स्त्री भविष्यवेत्ता म्हणुन आजही ओळखली जाते. "सहदेव भाडळी " हा ग्रंथ आजही भारतातील ज्योतीष्य शास्त्रातील प्रसिध्द ग्रंथ आहे. त्यातील भाडळी ही स्त्री मातंग होती हे सर्वमान्य आहे. मात्र संपुर्ण ग्रंथच  हां मातंग समाजाशी संबंधीत आहे. मात्र सहदेव ब्राम्हण असल्याची कपोलकल्पीत कथा त्यामध्ये घुसडविण्यात आली. आणि भविष्यवेत्ता भाडळीला श्रेय मिळू नये म्हणून सुध्दा त्यामध्ये भाकडकथा घुसवून मातंग समाजातील ज्ञानाचे अवमुल्यन करण्यात आले. मातंग समाजातील मागधी भाषेतील ग्रंथ संपदा नष्ट करून मुळग्रंथाचे ब्राम्हणीकरन करून त्यामधील मातंग संस्कृती , इतिहास पुर्णत: नष्ट केला. व संस्कृतमध्ये पुनर्लेखन करून ब्राम्हणीश्रेष्ठत्व त्यामध्ये घुसडवीले. मात्र मुळत: या देशातील सर्वमान्य व श्रेष्ठ संस्कृती मातंग होती.  मागीच्या उल्लेखावरून  स्वरूपावरून दिसून येते. 
 मुळ बायबल मधील उल्लेख Magos आहे. लेटीन किंवा ग्रीक भाषेत Budha  चा उल्लेख Buddos असा केला आहे. त्यावरुन Mag चा उल्लेख Magos केला गेला आहे यात काही शंका नाही. Magos हा  शब्द समाज यांचा इतिहास अतिशय प्रचंड आहे. Magi  मागी हे पारशी लोकांच्या धर्मगुरूला सुध्दा म्हटले जाते. प्राचीन पारसी लोकांना सुध्दा मांगी म्हटले जाते. त्याची संस्कृती व संबंध सुध्दा मातंग समाजापर्यंत पोहचतो. माझे वैयक्तीक मत असे आहे की मुस्लीम, ख्रिश्चन, पारसी, हिंदू या आधुनिक धर्माच्या अगोदर जो धर्म जगात होता तो मातंग धर्म होता. मातंग समाज होता. या विषयी पुढील लेखात मी त्याविषयी लिहीणार आहेच. 
मागी पुर्वेकडील राजे हे मातंग होते या विषयी आणखी एक पुरावा बघू . मागीचे अनेक चित्र रेखाटले आहेत . त्याविषयी अनेक पुस्तकें लिहील्या गेली आहेत. मांगी हे मातंग होते हे सिध्द करणारा पुराना म्हणजे उपरोक्त तिन्ही मागीच्या हातामध्ये डफ वाजवतांनाचे चित्र आहे.

Adoration of the Magi from the East, Church Agaçalti, IX-XI centuries, Ihlara Valley, Aksaray, Cappadocia, Central Anatolia, 

- Image ID: एडोरेशन ऑफ मागी नावाचे नवव्या ते अकराव्यया शतका दरम्ययानचे जे चित्र आहे. त्यामध्ये तिन्ही मांगी डफ वाजवताना  दिसत आहेत. मागी हे मांग आहेत या पेक्षषा मोठापुरावा तो काय. 
    
    मांगी हे मातंग होते, ते विद्वान होते. मांगी हे पुर्वेकडील राजे होते. मांगी हे मातंगच होते हे सिध्द करणारा आणखी एक पुरावा  The Catholic Encyclopedia vol 9 New york: Robbert Appleton company 1910 2 may 2015 मध्ये Magi या शब्दाचा अर्थ Drum Walter  सांगितला आहे. म्हणजे ड्रम वाजविणारा सांगीतला आहे. मागी हे पुर्वेकडील राजांसाठी वापरला जाणारा शब्द. मांगी हे पुर्वेकडील राजे होते. मांग हेच मागी होते. व मांगी हेच पुर्वेकडील राजे होते. मागी जेव्हा बेथलेहेम ला गेले तेव्हा भारतात कोणाचे राज्य होते. यांचा शोध आपण घेतला तर तेव्हा भारतामध्ये महाजन पद होते असा उल्लेख इतिहासात आहे. महाजन पदे याच्या सखोल मध्ये गेल्यास महाजन पदे हे महाजन पदे नसून मांगजन पद आहेत हेच सिध्द होईल. कारण सम्राट प्रसेनजीत महाजन पदातील एक राजा होता. आणि तो मातंग होता. इतर महाजन पदावरील राजे त्याचे नातेवाईक होते. बंगाल , विदर्भ प्रांतावर त्याचे राज्य होते. अनेक राजे शुद्र होते. हे सर्व  मातंग वंशाशी संबंधीत आढळतात. त्यामुळे महाजन पदे नसून मांगजन पदे असावीत अशी शंका आहे. मांग हे पुर्वेकडील शासक होते यात शंका नाही.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अस्पुश्यता ही इ.स. सहाव्या शतकामध्ये सुरू झाल्याचे उल्लेख केला आहे. अस्पृश्य पुर्वी कोण होते? या पुस्तकामध्ये त्यांनी मातंग स्त्री, मातंग राजपुत्री चा संदर्भ देऊन अस्पृश्यता ही सहाव्या शतकापर्यंत नव्हती. तर अस्पृश्य हे काही ठिकाणी  राजे होते  हे सांगितले आहे आणि आनंदाची गोष्ट म्हणजे त्यासाठी जे उदाहरण दिले ते मातंग राजपुत्रीचे उदाहरण दिले आहे.महात्मा फुलेंनी स्पष्टच म्हटले आहे मांग हे शासनकर्ते आहेत. महात्मा फुले आणि डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहीलेला इतिहास वाचल्याशिवाय मातंग समाजाला राजांचे गुलाम कसे झालो हे कळणार नाही.