रविवार, १६ फेब्रुवारी, २०२०

मातंग समाजातील सिल्लोड जळिता मृत संगिताताई कांबळे साठी महाराष्ट्र का पेटला नाही?

2 फेब्रुवारी 2020 रोजी व 3 फेब्रुवारी 2020 रोजी महाराष्ट्रात दोन समान घटना घडल्या सिल्लोड येथे 2 फेब्रुवारी रविवारला सिल्लोड तालुक्यातील अंधेरी या गावी संगीता कांबळे या मातंग समाजाच्या महिलेवर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला व तिने नकार दिल्यामुळे तिला पेट्रोल टाकुन पेटवण्यात आले.   त्यामध्ये ती 95% जळाली व नंतर तिचा मृत्यू झाला. 03 फेब्रुवारीला अंकिता पिस्सुडे या मुलीला हिंगणघाट येथे पेट्रोल टाकुन  जाळण्यात आले. त्यामध्ये ती 40 टक्के जळाली व नंतर तिचा मृत्यू झाला. या दोन्हीही घटना भिषण आणि लाजिरवाण्या आहेतच . दोन्ही आरोपींना कठोर शासन व्हायलाच पाहिजेत. पण या दोन्ही घटनेमुळे जातीयवादाचा लपलेला महाराष्ट्रातील चेहरा समोर आला. भाडखाऊ मेडीयाची छिनालवृत्ती दिसून आली. जात पाहून हळहळणारे समाजमन, जात पाहून संतप्त होणारे मानवतावादी पुढे आले. संगिता कांबळे हे नाव मेडीयात कुठेच नव्हते तर अंकिता ज्याची त्याची ताई झाली होती. कुठेतरी फक्त मातंग समाजाचे चार दोन कार्यकर्ते , त्यांच्या संगठना  संगिताताई साठी झटत होत्या तर अंकिता साठी सर्व स्तरावर सोशल मेड़िया, न्युज पेपर मधुन आग ओकल्या जात होती. अगदी फेसबुकवर राष्ट्रिय स्तरावरून प्रतिक्रिया येत होत्या. औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील साहेब यांनी संसदेमध्ये संगिताताई साठी आवाज उठवल्यानंतर तर संपुर्ण देशाला माहीत पडले की संगीताताई कांबळे यांना सुध्दा जाळून टाकण्यात आले आहे तरी सुध्दा अंकीतासाठी लिहीण्यात येणारे लेख, पोस्ट यांची दिशा संगीताताई कडे वळली नाही. नितीन राऊत या मंत्री महोदयांनी अंकीता ताईचा संपुर्ण मेडिकल खर्च सरकार उचलणार जाहीर केले. पण संगिताताई बद्दल त्यांना शब्दही माहीत नसावा त्यामुळे ते बोलले नसावे. अंकिता ताई यांच्यावर काय उपचार सुरू आहेत. कुठुन कुठे हलवले यावर मेडीयातून भरपुर छापुन येत होते मात्र संगिताताईचा मृत्यू झाल्यानंतरच व्हाट्स अपवर मातंग समाजाच्या ग्रुपवर पोस्ट आली आणि माहीत पडले कि संगिताताई कांबळे मातंग समाजाची महीलेला जाळून टाकून मारण्यात आले. 
                           अंकीताच्या मृत्यू अगोदर तीन दिवस अगोदर संगिताताईचा मृत्यू झाला होता तेव्हा महाराष्ट्राचे समाजमन हेलावले नाही. मात्र संगिताताईच्या मृत्यूवेळी घेनदेन नसणारा मेडीया मात्र अंकिताताईच्या मृत्यूवेळी मात्र प्रचंड भावनीक झाला. सर्व स्तरावरून अंकिताच्या मारेकरी याला फाशी द्या त्याला एन्काउंटर करुन मारून टाका. घश्याला कोरड पडेपर्यंत मागणी होत होती पण संगिताताईचा मारेकरी यांचे नाव ही कुणाला माहीत नव्हते. सारखेच कृत्य करणारे मारेकरी असतांनी एकासाठी एक न्याय व दुसर्याच्या
 साठी एक न्याय का? संगीताताईच्या मारेकऱ्यांने तर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला होता. सारं काही ठरवून पध्दतशीरपणे प्लॅन आखुन केले होते. तर अंकिताच्या मारेकऱ्यांने वेळेवर गाडितील पेट्रोल काढुन अंगावर ओतले होते. मग अंकीताचा मारेकरी विवेक नगराळे बौध्द आहे म्हणुन त्याचे एन्काऊंटर करा व संतोष मोहीते मराठा आहे म्हणुन त्यांचा निषेध सुध्दा करायचा नाही. ही जातियवादी मेडीयाची व समाजातील पांढरपेश्या निषेध करणारांची मानसिकता प्रचंड विकृत आहे. या मानसिकतेचे लोक कुलदीप सेंगर प्रकरणात उन्नाव घटनेतील पिडीता जेव्हा जाळुन टाकली तेव्हा का षंढ होऊन पाहत होते? मेडीया तेव्हा का षंढ झाली होती?  मग फक्त  अंकिता प्रकरणाला युगानुयुगा नंतर घडलेली घटना मेडीयाला का वाटते आहे? 
            अंकीता प्रकरणांमध्ये ओरडणारे जर प्रामाणिक असते तर त्यांना संगीताताईच्या प्रकरणाचे सुध्दा वाईट वाटले असते. जर अंकितामध्ये त्यांना ताई दिसली असती संगितामध्ये सुध्दा त्यांना ताईच दिसली असती. पण शंका आहे कि अंकिता प्रकरणांमध्ये रस्त्यावर उतरलेली मंडळी आणि मेडीया आसिफा प्रकरणांमध्ये आरोपीच्या समर्थनार्थ उतरलेली मंडळीतील काही मंडळी एकच आहेत. या प्रकरणात आपली पोळी भाजून घेत आहेत. आरोपीची आणि पिडीताची जात बघुन घटना व्हायरल केल्या जात आहे. ज्यामुळे दोन्ही समाजात संघर्ष निर्माण व्हावा. मात्र संगिताताईचे प्रकरण व्हाईरल यासाठी होत नाही की यांचा फायदा जातीयवादी संघटनांना होत नाही. दोन्ही प्रकरण जर व्हाइरल झाले तर लोकांच्या लक्ष्यात येईल कि गुन्हेगारांना जात नसते. पण अंकिता प्रकरणात तर फक्त गुन्हेगारांची जात दाखवायचा प्रयत्न केल्या जात आहे. तर संगिता ताईच्या घटनेत गुन्हेगाराची जात व प्रत्यक्ष गुन्हेगारालाच लपवलेल्या जात आहे.
      देशामध्ये देशद्रोही, भ्रष्टाचार, आतंकवादी घटना, बलात्कार या गुन्ह्यांमध्ये दलीतांचे प्रमाण अत्यल्प आहे. मोठमोठ्या करोडोच्या भ्रष्टाचारात व देशद्रोही घटनांमध्ये तर ते शुन्य आहे. एकुन बहुजन समाजाचे प्रमाणच शुन्य आहे. मात्र ज्या क्षुल्लक घटनांमध्ये जर आरोपी दलित असेल तर त्या घटनेला खुप मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी देऊन दलीत समाज त्यांची समानतावादी विचारधारा, त्यांचे महापुरुष यांना टारगेट  केल्या जात आहे. अंकीता प्रकरणांमध्ये सुध्दा फेसबुकवर छुप्या पध्दतीने हे केल्या जात आहे. या प्रकारे प्रेमप्रकरणातून हत्या केल्या गेल्याचे हे प्रकरण एकमेव नाही. या प्रकारचे कित्येक प्रकरनं यापुर्वीसुध्दा झाले आहेत. निर्भया किंवा हैदराबाद प्रकरणा इतकी  गंभीरता या प्रकरणाला का दिली जात आहे. मातंग समाजाच्या मातंग समाजाच्या नांदेड येथील चिमुकल्या विद्यार्थिनी पासुन तर संगीता कांबळे सारख्या महिलेसोबत अत्याचार होतात. मातंग समाज रस्त्यावर उतरतो तेव्हा मेडीयात हे प्रकरने का गाजत नाहीत.तेव्हा आज रोजी ट्रोल करणारी गॅंग कुठे असते? का न्याय मिळेपर्यंत प्रकरण मेडीयात राहत नाही.   
             विवेक नगराळे विरूध्द उज्वल निकम यांना लावण्यात येते. संगिता कांबळे कींवा इतर मातंग बघिनी यांच्या मारेकऱ्यांना अटक करा म्हणुन मोर्चा काढावा लागतो. मातंग समाजातील माझ्या बांधवांना मला हेच सांगायचे आहे. मेडीया हे मनुवाद्यांचे एक हत्यार आहे आणि ते पध्दतशीरपणे बहुजन समाजाविरोधात वापरले जाते हे साहेब कांशीरामजी सांगायचे. आपल्या विरोधातील अन्यायाविरुद्ध आपल्यालाच लढावे लागेल. मनुवादी मेडिया मदत करणार नाही. मनुवादी व्यवस्था उलथून टाकल्याशिवाय अन्याय अत्याचार ही थांबणार नाहीत. मनुवादी व्यवस्था उलथविण्यासाठी संपुर्ण दलीत, ओबीसी, आदिवासी यांना एकत्रीत यावे लागेल.
 फक्त मोर्चाने समश्या सुटत नसतात. तर समश्या केव्हा सुटते हे फुले, शाहू , आंबेडकर, अण्णाभाऊ, कांशीराम यांनी सांगितले आहे. संगिताताईला न्याय मिळेल की नाही माहीत नाही. मातंग समाजामध्ये आणखी दुसरी संगिता कांबळे होऊ नये यासाठी मुळापासून तयारी करावी लागेल. त्यासाठी मातंग समाजाने मेडियातील बातम्या वाचून आपली वैचारिक भुमिका न ठरवता मानवतावादी विचारधारेचा असल्यास करून तसे संस्कार येणाऱ्या पिढ्यांना दिले पाहिजेत. आपल्या प्रत्येक समश्येच्या मुळाशी जातीयवाद आहे हे लक्ष्यात घेतले पाहीजेत. प्रत्येक समश्येवर उपाय आहे. मात्र तो उपाय सोशल मेडीयावर न बोलता, न सांगता प्रत्यक्ष चर्चा करून समाजातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचून केडरकॅंपद्वारे  उपाय योजना  सांगता येईल. त्यासाठी लवकरच सर्वांनी केडरकॅंपच्या माध्यमातून भेटण्याचा प्रयत्न करत आहे.
               


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा